Maharashtra : खंडणीखोरांमुळे ६ हजार कोटीचा प्रकल्प राज्याबाहेर - देवेंद्र फडणवीस

पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात फोफावलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात फोफावलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले.

पुणे - पुणे ही मनुष्यबळाची खाण असल्याने इथे गुंतवणूक दार आकृष्ट होत आहेत. पण इथल्या गुन्हेगारीमुळे सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प कर्नाटकात गेला असा गौप्यस्फोट करत ही खंडणीखोर, वसुलीवाल्यांना ठेचून काढा अन्यथा तुमच्यावरच कारवाई केली जाईल अशी कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तंबी दिली. फडणवीस यांनी भर कार्यक्रमात ही माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात फोफावलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, पुणे पोलिस, पिंपरी चिंचवड, ग्रामीण पोलिसांची आज सकाळीच मी बैठक घेतली. आपल्याकडे उद्योजक यायला तयार झाले आहेत पण. त्यामध्ये उद्योजकांना, गुंतवणूकदारांना ब्लॅकमेलर त्रास देत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे, गटाचे, जातीचे, धर्माचे असेनात का त्यांना सोडू नका. या सर्वांच्या मुसकया बांधून त्यांना जेलमध्ये टाका, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आपल्याकडे उद्योगपती यायला तयार आहेत पण, खंडणीखोरांची इको सिस्टीम तयार झाली आहे. हे ब्लॅकमेलर उद्योगपतींना त्रास देत आहेत, पैसे मागत आहे. काही जणांकडे माथाडीचा परवाना नसतानाही ते वसुली करत आहेत.

आम्हालाच कंत्राट मिळाली पाहिजे म्हणून दादागिरी करत आहेत. अशी मानसिकता असणाऱ्यांची कंबरडे मोडून काढणार आहोत. आज दुपारी मला एक उद्योगपती भेटले. वर्षभरापूर्वी आम्ही सहा हजार कोटींची गुंतवणूक करायचे आम्ही ठरवले होते. पण त्यानंतर आम्हाला धमक्या मिळाल्या, वसुलीसाठी संदेश पाठविण्यात आले. त्यामुळे आम्ही ६ हजार कोटींची गुंतवणूक कर्नाटकामध्ये नेली. ही अवस्था आपल्याकडे होणार असेल तर भविष्यामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही. म्हणून काय वाट्टेल ते झाले तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. जर पोलिसांनी कारवाई केली नाहीत तर त्यांच्यावरच केली जाईल असे कडक आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आपल्याकडे येत आहेत. पुणे जिल्हा हा मनुष्यबळाची खान असल्याने ते आपल्याकडे आकर्षित होत आहेत. इथे जर आपण औद्योगीक वातावरण चांगले ठेवू शकलो नाहीत तर ते कसे होतील.

उद्योगामध्ये राजकारण आणू नका असे सर्व पक्षिय नेत्यांना आवाहन करतो. तसेच उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण झालेच पाहिजे. पण या कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वतःचे घर भरण्याचे काम करत असले तर सहन करणार नाही, त्याच्यावरही कारवाई करणार. असा स्पष्ट संदेश या माध्यमातून गेला पाहिजे. जसे मुंबई आपले विकासाचे इंजिन आहे, तसे पुणे हे दुसरे इंजिन आहे. दुप्पट वेगाने व क्षमतेने हे धावले पाहिजे यासाठी राज्य सरकार लक्ष देईल. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com