

Maharashtra Agriculture Department
esakal
मुंबई: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे १७ वर्षांनंतर कृषी प्रशासनाची नवी रचना आकारास आली आहे. या नव्या रचनेनुसार आता कृषी विभागात एकूण २३,४७६ नियमित पदे मंजूर करण्यात आली असून, यात २,६६८ नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.