CM Devendra Fadnavis
sakal
मुंबई - पुढील वीस वर्षांत राज्याला पाच ट्रिलियन डॉलरची (पाच हजार अब्ज डॉलर) अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत त्या मार्गावर नेणारा सात लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला.
राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा, सध्या सुरू असलेल्या योजना पूर्ण करण्यावर आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत तरतुदी करण्यावर सरकारने दिलेला भर ही २०२६-२७ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.