

Loan Relief for Farmers
esakal
मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या यादीतील सहा लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर पाच हजार २८ कोटी ७० लाख ३८ हजार २०६ रुपयांची रक्कम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांतरित केली. या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा प्रलंबित बाबी असतील, त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणावेळी ते बोलत होते.