

Maharashtra Farmers
esakal
सांगली: जिल्ह्यात खरीप हंगामाला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसामुळे पेरणी व रोपलागवडीची कामे सुरू असल्याने खतांची मागणी वाढली आहे. मात्र, खत विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना सेवा केंद्रांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.