Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

Crop Compensation : राज्यातील ६८ लाख शेतकऱ्यांच्या ४८ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचा पंचनामा अहवाल ३३ पैकी केवळ ५ जिल्ह्यांनी अंतिम स्वरूपात सादर केल्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले असले तरी, सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणे शक्य नाही, अशी स्थिती आहे.
Maharashtra Floods

Maharashtra Floods

Sakal

Updated on

सोलापूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आतापर्यंत बुलडाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नाही, अशी स्थिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com