
बॉलिबुडच्या महान गायिका आशा भोसले या मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलय.
जम्मू-काश्मिरच्या गुलमर्ग येथे हंगामातील पहिली हिमवर्षा झाली आहे, त्यानंतर परिसराचे सौंदर्य वाढले आहे.
गणेसोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या परतीच्या प्रवासाला विघ्न लागलं आहे. पाली- खोपोली महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळतेय.
अरुणाचल प्रदेशमध्ये तेझू विमानतळाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की अरुणाचल प्रदेशसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे.
उत्तरप्रदेशच्या नोयडा येथे मोटो-ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं आयोजन कऱण्यात आलंय. यावेळी योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पर्धेला हजेरी लावली.
माजी आमदार रमेश कदम यांचं सोलापुरमध्ये जंगी स्वागत कऱण्यात आलय. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्दरामय्या म्हणाले की भारतीय जनता पक्षाने सीमांकनाचा मुद्दा पुढे आणत महिलांसह देशाची फसवणूक केली आहे.
बिहारच्या मुजफ्फरनगरमध्ये विषारी दारु पिल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३ जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २ जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले मुंबईच्या लालबागचा राजाच्या दर्शनाला पोहचले. येथे त्यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेत गणेशोत्सवात सहभाग घेतला.
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा राजस्थानच्या उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत, या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज उदयपूरमध्ये दाखल होत आहेत.
तामिळनाडूमधील मदुराईच्या अण्णा नगर भागात एका कार्यक्रमात बॅरिकेड कोसळल्याने अनेक जण जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नऊ ट्रेन राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवतील.
राज्याचे उपमुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर आहेत, यादम्यान फडणवीसांनी शहरातील अंबाझरी परिसरात पूरामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली. नागपूरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूर आला होता. या पावसात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चीनमध्ये सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने पदकांचं खातं उघडले आहे. या स्पर्धेत भारताने तीन पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. रोइंग संघाने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे, तर एअर रायफल संघाने देशासाठी एक रौप्य पदक जिंकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.