
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक चांगल्या योजना आणल्या. अडीच वर्ष जनतेची सेवा केली. असे सांगत त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदें यांच्यावर (maharashtra politics jayant patil criticized eknath shinde) निशाणा साधला.
गेल्या अडीच वर्षात 12 हजार कोटी हे नगरविकास खात्यात दिले गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा आरोप चुकीचा आहे. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक दोष देण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा एक अद्भूत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष पवारांनी एकत्रित केले. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक चांगल्या योजना आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.