नागपूरः राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यामध्ये यासंबंधी एक बैठक झाल्याचीदेखील माहिती आहे. सोबत रविकांत तुपकर, आप, मंगेश साबळे अशी अनेक नावं आता पुढे येऊ लागली आहेत. बच्चू कडू यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना तिसऱ्या आघाडीचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्रित येऊन तिसरा फ्रंट तयार केला पाहिजे. जालना येथील सरपंच मंगेश साबळे यांच्याशीदेखील याबाबत बोलणं झालं आहे. जात, धर्म यावर अनेकांनी वोटबँक बांधली, पण आता शेतकरी वोटबँक तयार झाली पाहिजे.
तुपकर पुढे म्हणाले की, तिसरा पर्याय तयार झाला पाहिजे, आम्ही चांगल्या पर्यायाच्या शोधात आहोत. संभाजीराजे यांच्याशी बच्चू भाऊ बोलले आहे. पुढच्या पाच-सहा दिवसांत पुण्यात याबाबत बैठक होणार आहे.
''शेतकऱ्यांनी राग काढल्याने लोकसभेत महाविकास आघाडीला मतं मिळाली. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून निवडणूक लढवली पाहिजे. राजू शेट्टींना 2014 आणि 2019 ला निवडून दिले. यावेळी त्यांना का साथ दिली नाही याची चौकशी झाली पाहिजे? ज्यांना वाटतं शेतकरी एकत्र आलो पाहिजे, त्यांनी यात साथ देणं आवश्यक आहे.''
रवितांत तुपकर म्हणाले की, बच्चू कडू सध्या वेगवेगळ्या घटकांशी बोलत आहेत. बच्चू भाऊ यांची आम आदमी पक्षासोबत सोबत काय चर्चा झाली मला माहिती नाही. आपण एक पर्याय देऊ शकतो का, अशी प्रथमिक चर्चा झाली आहे. मी बुलढण्यात सहा जागा लढवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.