कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सोमवारी जाहीर झाली. प्रभाग रचनेचे नकाशे व तक्ते ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयात लावण्यात आले आहेत. येथे ग्रामस्थांनी नकाशे पाहण्यासाठी गर्दी केली होती. पहिल्यांदा तहसीलदारांनी प्रारूप प्रभाग रचना निश्चित केली. त्यावर हरकती देण्यास कालावधी दिला होता. हरकतींवरची सुनावणी झाल्यानंतर अंतिम आराखडा बनविण्यात आला. आता आरक्षण आणि त्यानंतर मतदार यादीचे कामही सुरू केले जाईल.