मुंबई : नुकत्याच संपलेल्या दहावी आणि बारावीचा (10th 12th Exam Result) परिक्षांचा निकाल ठरलेल्या वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच निकालासंदर्भात पुढील आढवड्यात बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Board Exam Result News)
राज्यातील काही भागांमध्ये शिक्षकांना दहावीचे पेपर तपाण्यास नकार दिल्याने परिक्षांचे निकाल वेळेवर लागणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. मात्र, या सर्व चर्चांमध्ये पार पडलेल्या परिक्षांचे निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या सर्व प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊ असेदेखील गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
परिक्षा पार पडल्यानंतर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. तर, त्यानंतर साधारण 15 दिवसांनी 10 वी चा निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे यंदाच्या परिक्षांचा निकाल देखील वेळेत लावण्याचा शिक्षण विभागाचा मानस असून, या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक पार पडणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.