'दहा मिनिटात १६ कोटी कमवूया अन् मिळून मंदिर बनवूया'

ram mandir
ram mandirFile Source

नागपूर : आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमिन खरेदी प्रकरणात घोटाळा (ram mandir land scam) झाला असल्याचा आरोप केला होता. "राम मंदिर ट्रस्टनं अयोध्येत २ कोटी रुपयांची जमीन १८.५ कोटी रुपयांना विकत घेतली. पण केवळ १० मिनिटांत जमिनीची किंमत १० पट कशी वाढली? असा सवालही त्यांनी केला होता. त्यावर देशभरातून टीकेची झोड उठविली जात आहे. त्यावरच आता महिला व बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांनी भाजप सरकारला खोचक टोला लगावला आहे. (minister yashomati thakur criticized bjp on ram mandir land scam)

ram mandir
'नर्मदा आरती'वर ७७ लाखांची उधळपट्टी, माहितीच्या अधिकारात बाब उघड

दहा मिनिटांमध्ये १६ कोटी कमवूयात आणि मिळून मंदीर बनवूयात, असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे. तोंडात राम असते आणि १६ कोटींची चोरी करतात. जे रामाच्या नावाने धोका देतात ते कोणत्या कामाचे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अयोध्या राममंदिर घोटळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

'राम मंदीराची वर्गणी खाणारे जनतेच्या योजनांचे पैसेही खाऊ शकतात' -

रामाच्या नावावर घोटाळा करण्यात आला आहे. जे रामाच्या नावावरील वर्गणी खाऊ शकतात ते जनतेच्या योजनांचे पैसे खाणार नाहीत, याची काही शाश्वती आहे का? असा सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. तसेच खाऊन ढेकर न देणारे हे लोक आहेत. १९८९ पासून 'चंदाजीवी' असणारे लोक वर्गणी गोळा करत आहेत. पण, हा घोटाळा फक्त १६ कोटींचा नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

नेमकं काय आहे प्रकरण? -

राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नुकतात आम आदमी पार्टी (AAP) आणि समाजवादी पार्टी (SP) यांनी केला होता. राम मंदिर ट्रस्टनं अयोध्येत जमीन खरेदी करताना दोन कोटी रुपयांची जमीन फक्त 10 मिनिटात 18 कोटींची कशी झाली असा सवाल राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. त्यानंतर देशात एकच वादळ उठले आहे. याबाबत राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा करावा, नाहीतर भाजप नेते आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढे येऊन खुलासा करावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आरोपांचे स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, 'आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना घाबरत नाही आणि याची चौकशी करून घेऊ.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com