लॉकडाऊन आवडे 'ठाकरे' सरकारला- राज ठाकरे

Raj Thackeray
Raj ThackeraySakal
Summary

महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. असे असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे.

मुंबई- महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. असे असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्यावेळेस पण दहीहंडी साजरी झाली नव्हती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. पी. साईनाथ जसे म्हणतात दुष्काळ आवडे सर्वांना, तसं लॉकडाऊन आवडे सरकारला अशी अवस्था आहे, असं राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Latest News)

लॉकडाऊनच्या काळात हजारो कामे वाजवली जाताहेत, त्याबद्दल कोणी बोलायला भाग नाही. दुसरी लाट, तिसरी लाट अशी भीती दाखवली जातीये. सर्व गोष्टी सुरुच आहेत. राणे प्रकरणात काय झालं, यांची हाणीमारी सुरु झाली आहे. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. पण, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही का? सभा घ्यायच्या, वाट्टेल ते करायचं, आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही का? क्रिकेट, खेळ सर्वकाही सुरु आहे. मग, सणांवरतीच बंदी का? त्यामुळे मी मनसैनिकांना दहीहंडी साजरा करण्याचा आदेश दिला आहे. जे होईल ते होईल, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
पाकमध्ये मंदिरावर हल्ला; जन्माष्टमीलाच कृष्णाची मूर्ती तोडली

जनआशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाऊन नव्हता. सण आला की लॉकडाऊन. सणांमधूनच रोगराई पसरते का? सभा, मेळावे आणि यांच्या हाणामाऱ्यांमधून रोगराई पसरत नाही का? यांना हवंय ते सुरु आहे. जनतेला घाबरवण्याचं काम सुरु आहे. जसं अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत ते मोजत नाही, तसं आमच्या अंगावर केस किती आहेत ते आम्ही मोजत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. दहीहंडी साजरा केल्यामुळे अनेक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी तयारी केली आहे. या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं.

Raj Thackeray
ऑडी कार अपघातात आमदाराच्या पुत्रासह सुनेचा मृत्यू; एकूण 7 ठार

विरोधीपक्षात असते तर यांनी काय केलं असतं. मंदिर उघडी केली गेली पाहिजेत. नियम लावायचा असेल तर सर्वांना एकच नियम लावा. यांची बाहेर जायला फाटते यात आमचा काय दोष. लाटा यायला काही समुद्र आहे काय? याच्या आधी देशात कधी रोगराई आली नव्हती का? आता बंद करुन ठेवायचं आणि आखणी झाली की निवडणूक जाहीर करायचा त्यांचा इरादा आहे. थर लावायचा नाही मग खुर्चीवरुन हंडी फोडणार का? असं वक्तव्य राजे ठाकरे यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com