राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.
यावर्षी राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली पिके सडून गेली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य मॉन्सून परतला असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. आता मॉन्सूनचे पुढील अपडेट एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहेत.
परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झाल आहे. त्यामुळे त्याचा फटका ओडीशा आणि बंगाल या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.