पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक - सुभाष देसाई

subhsh desai
subhsh desai
Updated on

मुंबई : मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देशातील उत्पन्नात राज्याचा 14.93 टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील पाच वर्षात सरासरी वाढ 9 टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन व नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा 20 टक्के वाटा आहे. सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा 55 टक्के आहे. केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार सन-2014 ते  मार्च-2019 अखेरपर्यंत 1,794 एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र शासनाकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून याद्वारे रु. 2 लाख 46 हजार 915 कोटी गुंतवणूक झालेली असून त्यामधुन 5.40 लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

मागील पाच वर्षात राज्यात एकूण 10 लाख 27 हजार 07 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग स्थापित झालेले असून, त्यामध्ये रु. 1 लाख 65 हजार 62 कोटी गुंतवणूक झाली आहे व 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झाली असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com