
छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने गेल्यावर्षी राज्यसेवेची ४५७ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. वस्तुनिष्ठ परीक्षेची ही शेवटची संधी आहे. यासाठी तब्बल अडीच लाखांवर अर्ज आले. मात्र, यात अधिकारी पदाच्या ३५ संवर्गापैकी १५ पदांची एकही जागा नाही. विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने लोकप्रतिनिधींकरवी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पाठविली, ‘सोशल मीडिया वॉर’ही केले. तरी शासन झोपेतून उठायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.