

Major change in MPSC
esakal
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या (गट - अ व ब) स्वरूपात मोठा बदल केला असून, २०२७ च्या परीक्षेपासून ‘वैकल्पिक विषय’ वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर मूल्यमापन पद्धतीत अधिक एकसमानता आणि प्रमाणबद्धता आणण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेचे एकूण गुण १७५० वरून १२५०, तर मुलाखतीसह एकूण गुण २०२५ ऐवजी १५२५ इतके होणार आहेत.