सोलापूर - उन्हाळा असो की पावसाळा, यात सामान्यांना सुखरूप घरापर्यंत पोचविणारी ‘लालपरी’ मुसळधार पावसातही सेवा बजावत आहे. दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असताना देखील ‘लालपरी’ने एक कोटी नऊ लाख किलोमीटर प्रवास केला आहे..८३ लाख प्रवाशांनी दोन दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १४ हजार ३४१ बसगाड्यांमधून प्रवास केला आहे. त्यातून महामंडळाला ६३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या साडेचौदा हजार बसगाड्या आहेत. पावसामुळे प्रवासाला विलंब होत आहे. अशा स्थितीत देखील लालपरी प्रवाशांना घरापर्यंत सुखरूप पोचवित आहे. २६ मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी मागील ५० वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला..तरीसुद्धा लालपरीने ५६ लाख २० हजार किलोमीटरचा प्रवास करून ४२ लाख २३ हजार प्रवाशांना सेवा दिली आहे. त्यातून महामंडळाला ३२ कोटी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आज देखील लालपरीने ४२ लाख प्रवाशांना सेवा देत ३१ कोटींचे उत्पन्न कमावले आहे..बस चालकांना सूचनारस्ता स्पष्ट दिसत नसल्यास बस पुढे नेऊ नयेपुलावरून जाताना बाजूचे सगळे कठडे दिसत असतील तरच बस पुढे न्यावीगाडी चालविताना मोबाईलवर कोणीही बोलू नये, पावसात वायपरचा वापर करावाजेथे दरड, झाडे कोसळतील अशी शक्यता आहे, अशा मार्गावरून जाताना गाडीचा वेग मर्यादित असावा.दोन दिवसांतील वाहतुकीची स्थितीएकूण बसगाड्या - १४,३४१एकूण प्रवास - १.१४ कोटी किलोमीटरएकूण प्रवासी - ८३ लाखमिळालेले उत्पन्न - ६३.११ कोटी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.