Maharashtra Farmers : केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत, राज्यात ५,८६६ कोटींचा निधी वितरित; लक्ष्मीपूजनानंतरही प्रतीक्षा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ₹३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलेले असतानाही, दिवाळी उलटून गेल्यावरही अतिवृष्टीग्रस्त ६३ लाख शेतकऱ्यांना केवळ ₹५,८६६ कोटींची मदत मिळाली असून, उर्वरित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
Only 63 Lakh Farmers Receive Compensation, Majority Still Await Aid From ₹31,000 Crore Package.

Only 63 Lakh Farmers Receive Compensation, Majority Still Await Aid From ₹31,000 Crore Package.

Sakal

Updated on

मुंबई : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार (ता. २१) पर्यंत केवळ ५ हजार ८६६ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. दिवाळसणातील लक्ष्मीपूजनाचा दिवस उलटला तरी केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली आहे. राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीतही राज्य सरकारच्या या मदतीची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com