
Only 63 Lakh Farmers Receive Compensation, Majority Still Await Aid From ₹31,000 Crore Package.
Sakal
मुंबई : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार (ता. २१) पर्यंत केवळ ५ हजार ८६६ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. दिवाळसणातील लक्ष्मीपूजनाचा दिवस उलटला तरी केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली आहे. राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीतही राज्य सरकारच्या या मदतीची प्रतीक्षा आहे.