Abdul Sattar : 'औरंगाबाद' नामांतराच्या मुद्द्यावरुन अब्दुल सत्तारांचं मोठं विधान; म्हणाले...

Abdul Sattar on Aurangabad
Abdul Sattar on Aurangabad

Aurangabad : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. या मुद्द्याकडे सध्या अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. त्यावरुन अब्दुल सत्तारांनी भाष्य केलंय.

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात औरंगाबादचं नामांतर झालं. औरंगाबादला संभाजीनगर असं नवीन नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मात्र त्यानंतर सत्तांतर झालं आणि शिंदे-ठाकरे यांच्या सरकारने तो निर्णय रद्द करुन नव्याने निर्णय घेतला. 'छत्रपती संभाजी नगर' असा नव्याने निर्णय सरकारने घेतला आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला.

Abdul Sattar on Aurangabad
Uddhav Thackeray : बैठकीला गेले आणि 'हो ला हो' करुन आले; सीमावादावर ठाकरे म्हणाले...

याबाबत आज मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, लवकरच औरंगाबादचं नामांतर होणार आहे. राज्य सरकराने मंजुरीसाठी केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे. लवकच केंद्राची त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती तेव्हा ठाकरे सरकारने घाईघाईने अनेक निर्णय घेतले होते. दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाची त्यावेळी चर्चा झाली. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर ठाकरे सरकारचे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com