

Namo Sanman
esakal
सांगली: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात या योजनेचे सुमारे ३ लाख ९३ हजार लाभार्थी आहेत. गेल्या दोन हप्त्यांची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे ‘नमो सन्मान’चा नववा हप्ता कर्जमाफीच्या प्रक्रियेशी जोडला गेला आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.