राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्येही आता राष्ट्रगीत - उदय सामंत

Uday-Samant
Uday-Samant

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून (ता. १९) राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये दररोज सकाळी राष्ट्रगीतानेच कामकाजाची सुरुवात होईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली.

पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रश्‍नांसदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, ‘महाविद्यालयांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्यात येईल. यामुळे राज्यात दररोज किमान १५ लाख विद्यार्थी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हणणार आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. महाविद्यालयांना याबाबतचे परिपत्रक पाठविण्यात येणार आहे.’’ या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने उपस्थित होते. 

‘विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ परीक्षेचा अर्ज भरताना तो चुकल्यानंतर दुसरा अर्ज भरताना पुन्हा शुल्क भरावे लागत होते. आता हा नियम रद्द करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना दुसरा अर्ज भरावा लागला, तरी एकदाच शुल्क आकारले जाईल. तसेच, विद्यापीठ कायद्यातील काही तरतुदी चुकीच्या असल्याने संस्थाचालकांना अडचणीच्या ठरत आहेत. त्यात बदल करण्याची मागणी होत आहे. यावर अभ्यास करून बदल सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे,’’ असे सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com