राज्यात जातीय दंगल घडवून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील

Jayant Patil
Jayant Patilesakal
Summary

'सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाहीय; पण..'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील, अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलाय. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भोंगा वाजवण्याचा प्रयत्न सुरु झालाय. यावरून राज्यात जातीय दंगल घडेल असा कयास बांधला जातोय. राज्यात जातीय दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न सुरुय. तसंच सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाहीय. परंतु, ज्या दिवशी भाजपला कळेल त्या दिवशी भाजपकडं काहीही राहणार नाहीय, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

Jayant Patil
राज ठाकरेंवरील टीकेनंतर शालिनीताईंचा प्रकाश आंबेडकरांच्या मुलावर प्रहार

ईडीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीला संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणायचीच होती तर आधी त्यांना माहिती दिली पाहिजे होती. त्यामुळं ही कारवाई म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतोय, असं वक्तव्यही राष्ट्रवादी काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com