मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. दुभंगलेले मने, दोन भाऊ आणि पक्ष एकत्र येत असतील तर हरकत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय हालचालींचे सूतोवाच केले.