
सोलापूर : कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 15 जूनपासून राज्यातील कोणतीही शाळा उघडणार नाही. परंतु, त्या दिवसापासून त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तर शाळा सुरू करण्याचा अधिकार जिल्हा परिषद, कोविड-19 ची ग्राम समिती, शाळा व्यवस्थापन समिती यांना राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील गडचिरोली, नंदूरबार, अमरावतीपासून कोकण व मुंबई-पुण्यातील सर्वच विद्यार्थ्यांना 15 जून पासून शिक्षण मिळेल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ज्या मुलांकडे अथवा त्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने कशाप्रकारे शिक्षण देता येईल याचेही नियोजन झाले आहे. त्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने पुस्तके पोहोच केली जाणार असून त्यांना स्वयंअध्ययन करावे लागणार आहे. त्यावेळी त्यांना येणाऱ्या अडचणी ते त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून सोडवतील अशी ही व्यवस्था तयार केल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या. ऑनलाइन शिक्षणाचा विपरीत परिणाम होऊ नये अथवा त्याचा भडिमार होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार चाळीस मिनिटे अथवा एक तासाचे लेक्चर तयार केले जाणार असून प्रत्येक तासाला त्यांना विश्रांती दिली जाणार आहे. या भागांमध्ये अथवा तालुक्यांमध्ये कोरोनाचा काही प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणच्या शाळा दोन-तीन सत्रामध्ये भविष्यात सुरू होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.