हृदयरोगाचा आरोग्यावर सर्वाधिक फटका; दररोज 120 मृत्यू

Heart-Attack
Heart-Attacksakal media

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात, असंसर्गजन्य रोगांमुळे (Non infectious Deceases) लाखो लोकांना आपला जीव गमवावा (people death) लागतो. परंतु, हृदयाशी संबंधित रोग सर्वात जास्त जीव घेणे ठरत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (central health ministry) अंतर्गत कार्यरत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 5 वर्षात उच्च रक्तदाब आणि हृदयरोगामुळे (heart decease) 2 लाख 19 हजार 268 मृत्यू झाले आहेत. जर वरील मृत्यूंची गणना केली तर रोगांमुळे दररोज सरासरी 120 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Heart-Attack
महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णय; वाचा सविस्तर

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हृदयविकार हा सर्वात जास्त किलर आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. आरोग्य आणि सेवा संचालनालयाचे उपसंचालक डॉ.जी.एम. गायकवाड यांनी सकाळला सांगितले, 'हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली अनियमित जीवनशैली आणि आहार. दरवर्षी 50 हजारांहून अधिक लोक हृदयरोगामुळे मरण पावतात. हे आकडे वाढत आहेत, त्यामुळे लोकांनी आपली जीवनशैली सुधारणे आणि जंक फूड ऐवजी पौष्टिक आहार घेणे आणि काही शारीरिक व्यायाम आणि योगा करणे आवश्यक आहे.

आकडेवारीनुसार  (एप्रिल-मे पर्यंत)

वर्ष            महाराष्ट्र    मुंबई

2017-18  42166  1370

2018-19  48479  2436

2019-20  51369  7256

2020-21  53750  4815

2021-22  15565   498

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com