आता महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस ठाणे

mantralya-mumbai
mantralya-mumbai
Updated on

मुंबई - महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराची तक्रार पोलिस ठाण्यात येऊन नोंदविता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत गृह विभाग प्रयत्न करणार आहे.

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, असा आदेश त्यांनी गृह विभागास दिला आहे. महिला अत्याचाराच्या घटनेत न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास विलंब लागतो. यात न्यायासाठी झगडणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावी यासाठी महिला अत्याचाराची प्रकरणे लवकर निकाली लागण्यासाठी राज्य सरकार द्रुतगती न्यायालय, विशेष न्यायालयांची स्थापना यांसारख्या गोष्टी प्राधान्याने हाती घेणार आहे. राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण हाही त्यातील एक महत्त्वाचा विषय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com