now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad
now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad

'आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही'; जवानांची आव्हाडांकडे तक्रार

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला त्यानिमित्त आज 95 वा चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला, यादरम्यान भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटच्या माजी जवानांची गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे भेट घेतली. यावेळी रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांनी व जवानांनी महाड येथे "रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही" अशी तक्रार केल्याचे आव्हाड यांनी सांगितले

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडियावर जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, "महार रेजिमेंट ही भारतीय सैन्य दलातील एक प्रमुख रेजिमेंट आहे. त्याच्या स्थापनेच श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज त्या रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांची व जवानांची महाड येथे भेट घेतली". या भेटीदरम्यान माजी सैनिकांनी आव्हाड यांच्याकडे रेजिमेंटमध्ये आता त्यांनी 'जय भीम' म्हणता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad
"..दादांनी पंतप्रधानांना वैद्यकीय उपचार घेण्याचा आग्रह धरला पाहिजे"

आव्हड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्या माजी जवानांशी चर्चा करत असताना,"आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जयभीम म्हणता येत नाही,"अशी तक्रार त्यांनी केली. यावर पुढे आव्हाड म्हणाले की, "जयभीम ही एक क्रांतिकारी ऊर्जा देणारी घोषणा आहे. त्याच्यावर बंदी का आणली..? हा प्रश्न आम्ही भारतीय लष्कराचे प्रमुख व संरक्षण मंत्र्यांना विचारणार आहोत." असे देखील त्यांनी सांगितले.

now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad
Apple Watch ने वाचवला वापरकर्त्याचा जीव; 'हे' खास फीचर ठरलं जीवनदायी

आज चवदार तळे सत्याग्रहाला 95 वर्ष पुर्ण झाले असून हा दिवस महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला होता. त्यानंतर हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, हा दिवस समाजातील बऱ्याच घटकांसाठी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे.

now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad
15 हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळेल 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com