Dnyanjyoti Adhar Yojana : ओबीसी विभागाला ‘ज्ञानज्योती आधार योजने’चा विसर, राज्यातील २१ हजार ओबीसी विद्यार्थी अडचणीत

OBC Student Education : शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली होती, ज्यात प्रत्येक जिल्ह्यात ६०० विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.
Dnyanjyoti Adhar Yojana
Dnyanjyoti Adhar YojanaSakal
Updated on

वर्धा : शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० क्षमतेची दोन वसतिगृहे मंजूर केली आहेत. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांसाठी बाहेरगावी शिक्षण घेण्याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० विद्यार्थ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी ६० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. संपूर्ण राज्यात २१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र, सध्या या योजनेचा विसर शासनाला पडला असून कुठलाही निधी या विद्यार्थ्यांना मिळाला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com