
शिर्डी : विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीत खालच्या पातळीवरील व्यक्तिगत टीका करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गलिच्छ प्रचाराची राळ उडवून देण्यात आली, तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी दाखविली. भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचारावर श्रध्दा ठेवली. त्यांची व्यूहरचना आणि झंझावाती प्रचाराचा भाजपच्या महाविजयात महत्त्वाचा वाटा राहिला.