
मुंबईः राज्यातील सर्वच शीव-पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शीव-पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.