
पाली : पाली-सुधागड परिसरातील रस्त्यांवर असलेल्या धोकादायक व जीवघेण्या खड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे. मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे पालीतील रस्ते व वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी (ता. 19) या सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाणार आहे.