CM Devendra Fadnavis : ‘पानिपत’ हा मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास

पानिपत ही मराठ्यांच्या पराभवाची नाही तर शौर्याची लढाई आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis esakal
Updated on

‘पानिपत ही मराठ्यांच्या पराभवाची नाही तर शौर्याची लढाई आहे. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्याचे शल्य मनात असेल, पण तिथे आमचा पराभव झाला असे आम्ही मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊनच महादजी शिंदे यांनी नंतर दिल्ली जिंकली. छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला.

या देशासाठी मराठे लढले. म्हणूनच त्याठिकाणी शौर्याचे स्मारक तयार झाले पाहिजे. त्यासाठी येथील काला आंब परिसरात मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवणच करून देईल.

पानिपतात मराठे जिंकले नाही तर मराठ्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पुसता येणार नाही, असे नमूद केले. त्यावर फडणवीस यांनी पानिपतची लढाई ही आमच्या शौर्याची लढाई असल्याचे स्पष्ट केले. ‘अब्दालीशी मराठ्यांचा काहीच संबंध नव्हता. मराठ्यांनी त्यावेळी देशात ताकद उभी केली होती.

तेव्हाचा दिल्लीचा बादशहा मराठ्यांना चौथाई द्यायचा. ज्यावेळी अहमदशहा अब्दालीने येऊन दिल्लीवर कब्जा केला तेव्हा बादशहाने मराठ्यांना मदतीला येण्यासाठी पत्र लिहिले. मराठ्यांनी दिल्ली जिंकली. तेव्हा अब्दालीने समझोता करण्यासाठी मराठ्यांना पत्र पाठविले.

त्या आधी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी तो आला होता. पण मराठ्यांनी उत्तर पाठविले एक इंचही जमीन देणार नाही. त्यामुळे पानिपतची लढाई झाली. ती लढाई मराठे जिंकलेच होते. मराठ्यांना कोणाचीच मदत झाली नाही. तरीही मराठे भारतासाठी लढले. पानिपतात गोलाची लढाई होती. पण दुर्दैवाने गोल फुटला. तिथे पारडे अब्दालीच्या बाजूने झुकले,' असे फडणवीस यांनी सांगितले.

मराठे देशासाठी लढले

'ही लढाई इथे संपत नाही. त्यानंतर महादजी शिंदे यांनी दहा वर्षांनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एकछत्री अंमल आणला. अब्दालीला मराठ्यांनी इतके उद्‍ध्वस्त केले होते की तो या देशात थांबलाच नाही. तो त्यांच्या मूळ गावी परत गेला. म्हणून पानिपतच्या लढाईबाबत काही शल्य असेल, पण आमचा पराभव झाला असे मानत नाही.

पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदे यांनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला. या देशासाठी मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे,’ असे त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com