बेशिस्त वाहनांना आता ऑनलाइन दंड! ‘ई-चालान’मुळे वाहतूक पोलिसांची बदनामी थांबली

‘ई-चालान’मुळे वाहनचालकांकडून रोखीने पैसे (लाच) घेण्याचे प्रकार थांबले आहेत. ‘बॉडी वॉर्म’ कॅमेऱ्यांमुळे शासकीय कामात अडथळ्याच्या केसेस कमी झाल्या आहेत. आता बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिस रोखीने नव्हे तर ई-चालानद्वारेच दंडात्मक कारवाई करतात. वरिष्ठांनीही तशा सूचना दिल्या आहेत.
Traffic Police
Traffic Policesakal media

सोलापूर : ‘ई-चालान’मुळे वाहनचालकांकडून रोखीने पैसे (लाच) घेण्याचे प्रकार थांबले आहेत. ‘बॉडी वॉर्म’ कॅमेऱ्यांमुळे शासकीय कामात अडथळ्याच्या केसेस कमी झाल्या आहेत. आता बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिस रोखीने नव्हे तर ई-चालानद्वारेच दंडात्मक कारवाई करतात. वरिष्ठांनीही तशा सूचना दिल्या आहेत. जेणेकरून पोलिसांची बदनामी होणार नाहीत आणि वादावादीदेखील कमी होईल, हा त्यामागील हेतू आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहनचालकांना केले जाते. त्यासाठी दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो. तरीपण, दरवर्षी सोलापूर शहर-जिल्ह्यातील आठ ते दहा लाख वाहनचालक नियम मोडतातच, हे विशेष. दुचाकीवर पुढे लहान मुलांना बसवू नका, हेल्मेटचा वापर करा असे सांगूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तविक पाहता दुचाकीवरील चिमुकला किंवा मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक आहे. पण, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही किंवा वाहनचालक त्याचे पालन करीत नाहीत. पण, आता रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेल्या किंवा वाहतूक पोलिसांनी हात करूनही न थांबणाऱ्या वाहनांना आता ऑनलाइन दंड केला जातोय. रोखीने दंड घेण्याचे प्रमाण आता १० टक्क्यांवर आले आहे. ‘ई-चालान’च्या दंडाचा मेसेज तत्काळ त्या वाहनमालकाला जातो. दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. दरम्यान, विनाकारण कोणत्याही (दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा परराज्यातील) वाहनांना अडवून त्रास देऊ नका, अशा सक्त सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

मोठ्या वाहनांना ऑनलाइन दंड सोयीचा

रस्त्यात वाहन उभे करून कुठेतरी गेलेल्यांना रोखीने दंड करणे शक्य होत नाही. मोठे वाहन टोईंग करून नेणेही अशक्य असते. त्यामुळे तशा वाहनांना ई-चालानद्वारे ऑनलाइन दंड केला जातो. सर्वांनी वाहतूक नियम पाळावेत, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

ऑनलाइन दंडामुळे वादावादी झाली कमी

वाहतूक पोलिसांची बदनामी ई-चालानमुळे थांबली आहे. बेशिस्त वाहनचालकाकडे पैसे नसल्यास ऑनलाइन दंड शक्य आहे. चोरीचे, परवाना निलंबन केलेले किंवा आर्युमान संपलेले वाहन असल्यास ई-चालानमधून तत्काळ समजते. ऑनलाइन दंडामुळे वादावादीचे प्रसंग कमी झाले आहेत.

- मनोज यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण

दरवर्षी २८ हजार अपघाती मृत्यू

वाहतुकीचे नियम हे दंड वसुलीसाठी नसून वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होणार नाही, हा त्यामागील मुख्य हेतू आहे. हेल्मेट असतानाही घालत नाहीत, सीटबेल्टचा वापर होत नाही, वाहनांचा वेग जास्त असतो, विरूध्द दिशेने वाहन चालवतात, क्षमतेपेक्षा अधिक मुलांची किंवा प्रवाशांची, मालाची वाहतूक केली जाते. मोबाईल टॉकिंग, मद्यपान करून वाहन चालविले जाते. त्यामुळे राज्यात दरवर्षी सुमारे २५ ते २८ हजार वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होतो. पण, तुम्ही बाहेर गेल्यानंतर घरातील सर्वजण तुमची वाट पाहत असतात हे वाहनचालकांनी कायम लक्षात ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com