सरकार गेंड्याच्या कातडीचे - तनपुरे

Prasad-Tanpure
Prasad-Tanpure

राहुरी - ‘‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा फार्स करतात, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा झाला असला, तरी दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या तोंडचे पाणी देणे चुकीचे आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आज राज्य सरकारवर टीका केली.

‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध विविध पक्ष- संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नगर- मनमाड मार्गावर बाजार समितीसमोर ‘चक्का जाम’ आंदोलन केले, त्या वेळी तनपुरे बोलत होते. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले आदी उपस्थित होते. तहसीलदार अनिल दोंडे यांना निवेदन देण्यात आले.

तनपुरे म्हणाले, ‘‘जायकवाडीत सध्या पुरेसा साठा आहे. बिअरच्या कारखान्यांना पाणी देणे सयुक्तिक नाही. अडीच टीएमसी वहनतूट ऊर्ध्व धरणांच्या माथी मारली. शासनाला दुष्काळाच्या वास्तवाचे भान नाही. पाणी दिल्यास नगर जिल्ह्यात आठ महिने पाणीटंचाई सहन करावी लागेल. जिल्ह्यात आजच शंभरावर टॅंकर सुरू असून, लवकरच ही संख्या हजारावर जाईल. आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com