Maharashtra Rain : नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करा : मंत्री मकरंद पाटील

Pre Monsoon Damage : मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यभरात शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, पंचनाम्याचे आदेश मदत मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत.
Makarand Patil
Makarand PatilSakal
Updated on

मुंबई : संपूर्ण राज्याला मान्सूनपूर्व पावसाने यंदा चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. त्यामुळे भिंतींसह घरे पडली आहेत. जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. याच संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय निकषानुसार पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com