water supply issuesakal
महाराष्ट्र बातम्या
Raigad News: नेरळमध्ये पाणीबाणी! आठवडाभरापासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांची वणवण
Neral Water Supply: गेल्या चार ते पाच दिवसांपासून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक सध्या गंभीर पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमता, नियोजनशून्यता आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.