

पुणे : ‘‘सध्या महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला आहे. जातीयवाद पसरविला जात आहे. सोशल मीडियातून तरुणांची माथी जाणूनबुजून भडकवली जात आहेत,’’ असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ‘मनसे’चा १९ वा वर्धापन दिन मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केला होता. या वेळी ठाकरे बोलत होते.