

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर आश्चर्य व्यक्त करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा संख्येवर भाष्य केले. त्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ४२ आमदार निवडून आल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.