
नागपूर : ‘‘देशात १६ हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ते संशोधन करतात परंतु ते प्रयोगशाळेत करतात आणि शेतकरी काम करतो शेतात. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत ते लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान बांधावर पोहोचलेच नाही. यापुढे आता दिल्लीतून नाही, तर शेतातून संशोधनाची दिशा ठरेल,’’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.