

पुणे : ‘गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना, काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होते. त्यांचा प्रस्ताव ‘एसीबी’कडे पाठविण्याची वेळ येते. सर्व मर्यादा पार केल्यावर हे करावे लागते,’’ असे सांगतानाच ‘‘एका तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्यापासून सचिवांपर्यंतचे सर्वांचे अधिकार वापरले. २२ लक्षवेधी तहसीलदारावर होतात हे चांगले नाही. तसेच, निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.