Rutuja Latke: 'मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना' ; काँग्रेसकडून उभा राहिलेल्या अभय पाटलांनी सांगितला किस्सा

Rutuja Latke should fill the application Says Congress Abhay Patil
Rutuja Latke should fill the application Says Congress Abhay Patil esakal

अंधेरी पोटनिवडणुकीवर २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिलेले उमेदवार अभय पाटील यांनी भाष्य केलं आहे. ऋतुजा लटके यांनी न डगमगता अर्ज भरावा. तुम्हाला नक्की निवडणूक लढता येईल. असे विधान अभय पाटील यांनी केलं आहे. तसेच, मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना होत आहे. माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी वेळ नव्हता. असा किस्सा शेअर करत मनातील खंत व्यक्त केली आहे. (Rutuja Latke should fill the application Says Congress Abhay Patil )

उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नाही. राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नसल्याने ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, लटके यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशातच २०१९ मध्ये अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील उभा राहिले होते. तेदेखील शासकीय सेवेत होते. याबाबत अभय पाटील म्हणाले की, मी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होतो. माझा राजीनामा मी दीड महिन्यापूर्वी दिला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी माझा राजीनामा मंजूर करणार नाही असं स्पष्ट सांगितले होते. मी न्यायालयीन बाबी ठेवल्यानंतर सचिवांनी सही करून दिली. परंतु तत्कालीन मंत्र्यांची सही हवी होती असं सांगण्यात आले. सचिवांच्या सहीनंतर खरेतर मंत्र्यांच्या सहीची गरज नव्हती. याच पद्धतीने ऋतुजा लटकेंबाबत प्रकार सुरू आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत १ महिन्यापूर्वी राजीनामा दिला असेल तर तो मंजूर व्हायला हवा. स्थानिक निवडणुकीत राजीनामा न देता निवडणूक लढवली जाते. निवडून आल्यानंतर राजीनामा दिला जातो. परंतु आता कायदेशीर प्रक्रिया आहे. शिवसेनेने पूर्ण ताकद लावावी. प्रत्येक उमेदवाराने काळजी घेणे गरजेचे आहे.

मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना होत आहे. माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी वेळ नव्हता. शिवसेनेकडे वकिलांची टीम आहे. अर्ज भरून घ्यावा. या बाबींवर निवडणूक अधिकारी हरकत घेऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज बिनधास्त भरावा. कायदेशीर बाबींचा अभ्यास करता येईल. अर्ज भरायला हवा असं मला वाटतं असं काँग्रेस नेते अभय पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com