
मुंबईच्या एसीमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची झळ नाही-सदाभाऊ खोत
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी वर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. गढूळ मतांचे राजकारणी करत साधं पिण्याचं पाणी सुध्दा देऊ शकत नाहीत असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. (Sadabhau Khot News)
राज्यात उन्हाळ्यामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान मुंबईच्या आदिवासी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याकडे मुख्यमंत्री महोदयांना लक्ष द्यायला वेळ नाही अशी नाराजी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
गढूळ मतांचे राजकारणी.. देऊ शकत नाहीत साधं पिण्याचं पाणी.आदिवासी भागातील ही दुष्काळाची झळ मुंबईच्या एसी मध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जाणवणार नाही असे ट्विट करत निशाणा साधला आहे.
Web Title: Sadabhau Khot Criticism On Uddhav Thackeray Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..