

Sahasrakund Waterfall Remains Dry
esakal
ईस्लापूर: जुलै महिना संपत आला, तरी किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा अद्यापही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला नसल्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच रौद्ररूप धारण करणारा सहस्रकुंड धबधबा यंदा मात्र शांत असून, निसर्गप्रेमींना अपेक्षित दृश्य पाहायला मिळत नसल्याने पर्यटनावरही परिणाम होत आहे.