Maharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Politics : ‘पवारांनी जबाबदारी स्वीकारावी’ : खासदार संजय राऊत
Marathi Sahitya Sammelan : खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीसाठी स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना जबाबदार धरले.
मुंबई : ‘‘साहित्य महामंडळ खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहे. या साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी स्वीकारून त्याचा निषेध करावा,’’ अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी आज केली. या संमेलनात ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि राजकीय चिखलफेक झाली त्यामुळे शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने ते देखील तितकेच जबाबदार आहेत, असे राऊत म्हणाले.

