न्यायालय रामशास्त्री बाण्याने वागले तर... संजय राऊतांचं वादग्रस्त विधान

Sanjay Raut has doubts about the suprim court
Sanjay Raut has doubts about the suprim courtSanjay Raut has doubts about the suprim court

मुंबई : राज्य सरकारच्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याकडे आमचे लक्ष लागून आहे. निर्णय काय येतो माहिती नाही. मात्र, रामशास्त्री बाण्याने न्यायालय वागले तर शिवसेनेचा विजय होईल, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Sanjay Raut has doubts about the suprim court)

सुप्रीम कोर्टात अद्यापही सुनावणी सुरू आहे. बहुमत चाचणी आणि अपात्र उमेदवारांच्या निर्णयावर दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये चांगलाच युक्तिवाद सुरू आहे. ‘रामशास्त्री बाण्याने न्यायालय वागले तर शिवसेनेचा विजय होईल’ असे म्हणून खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या वागण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

Sanjay Raut has doubts about the suprim court
सुनील केदार म्हणाले, काँग्रेस बाहेर राहूनही सहकार्य करण्यास तयार

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच माणसांनी दगा दिल्याचे आज बोलून दाखवले. त्यांच्या मनातील दुःख स्पष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्याने ही वेळ आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

बंडखोर आमदारांनी लोकशाहीची हत्या केली. शिवसेनेची (Shiv Sena) हत्या केली. ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील आणि राहायलाच पाहिजे. त्यांना वर गेल्यावर याचा हिशोब द्यावा लागेल. उद्या जे व्हायचे आहे ते होईल. मात्र, महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी भाषण केले तेव्हा ते निरोप देत आहेत असे वाटले नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com