Sanjay Raut: नेहरुंपासून ते मोरारजींपर्यंत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितली होती; राऊत म्हणाले...

Pandit Nehru Morarji Desai Sanjay Raut
Pandit Nehru Morarji Desai Sanjay Rautesakal
Updated on

मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहे. यासंदर्भात आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर आसूड ओढला.

राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्र शिवरायांची बदनामी कधीही खपवून घेणार नाही. यापूर्वी पंडित नेहरुंनी छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. परंतु त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली. कारण ते मोठे नेते होते. मोरारजी देसाई यांनीही चुकीच्या विधानानंतर माफी मागितली होती. परंतु भाजपच्या आराध्य दैवतांकडून छत्रपतींचा अवमान होतोय आणि माफी मागितली जात नाही. आता महाराष्ट्र आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही... वेट अॅंड वॉच.. असा गर्भित इशारा संजय राऊतांनी दिला.

''नेहरु होते म्हणून देश निर्माण होऊ शकला. नेहरुंवरील चिखलफेक थांबवली पाहिजे. मुळात ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं, त्यांचा अपमान थांबवा'' असं आवाहन संजय राऊतांनी केलं.

राऊतांनी यावेळी सर्व विरोधक एकत्र आल्याचं सांगितलं आहे. आमचा अॅक्शन प्लॅन तयार असून त्याबाबत हालचाली सुरु आहेत, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com