नवी दिल्ली - मणिपूरमधील हिंसाचारावरून देशाचं राजकारण तापलं आहे. यावरूनच आज विरोधकांनी सभागृहात सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचं ठरवलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव आमचं एक आयुध आहे. पंतप्रधान लोकसभेत येऊन देशातील अनेक प्रश्नावर उत्तर देतील अस वाटतं. त्यांच्याकडे बहुमत आहे, पण त्यांनी मणिपूरबाबत संसंदेत निवेदन द्यावं हिच आमची मागणी आहे. तसेच अविश्वास ठरवावबाबत जेवढ्या अपेक्षित आहे, त्या साह्य आमच्याकडे आहेत.
इंडियाबाबतच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, विरोधकांबाबत पंतप्रधान यांनी संयम ठेवावा. या देशात इंडिया शब्दाने चांगल्या गोष्टी देशात घडतात. मदर इंडियायतील इंडिया त्यांना नकोय का? NDA मधील अनेक पक्षात इंडिया आहे, मग त्यांना पण नाव बदलायला सांगणार का ? असा प्रश्न विचारतानाच मोदींच्या वक्तव्याने देशाचा अपमान झाल्याचा दावा राऊत यांनी केला.
दिल्ली अध्यादेशावर राऊत म्हणाले की, माझी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही 'आप'सोबत उभे आहोत. अजित पवार यांच्याविषयी मला जास्त माहीत नाही, पण त्यांचे मन वळविण्याचे काम सुरू असल्याचं राऊत म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.