मुंबई : शिंदे गट आणि भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. हे सरकार स्थापन होऊन अर्धा महिना लोटला आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडून अन्य कोणत्याही मंत्र्याने शपथ घेतलेली नाही. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना ट्विट करीत सवाल केला आहे. (Sanjay Raut tweet marathi news)
‘भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४, १अ नुसार राज्य मंत्रिमंडळात किमान १२ मंत्री असायला हवे. यापेक्षा कमी मंत्रिमंडळाला संविधान मान्यता देत नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. घटनात्मक नसलेल्या निर्णयांना वैधता नसते. राज्यपाल, काय चालले आहे?’ असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहे. आता २० जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आता या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की नाही, हेच पाहणे बाकी आहे.
एकनाथ शिंदे गटच्या निलंबित केलेल्या १६ आमदारांवर अद्याप निर्णय आलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (supreme court) या प्रकरणात घाईघाईने निर्णय देता येणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळेच आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला होता. मात्र, सुप्रीम कोर्टातून निर्णय न आल्याने थोडक्यात विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आधी १९ तारीख ठरवण्यात आली होती. आता ती २० जुलै झाल्याची माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.