‘खबरदारी घेऊनच शाळा सुरू करणार’

शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad sakal

मुंबई - ‘महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता आहे. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल’, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचली आहे. ‘कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्यानेच शाळा सुरु केल्या जातील,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य मंडळाच्या शाळा १३ जून तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचाही प्रश्न आहे. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com